50 नवे विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम उभारणार

airports, heliports and water aerodromesनवी दिल्ली – देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी 50 नवे विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमत्र्यांनी केली आहे. देशात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करीत असून नव्या विमानळाची उभारणी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल.

देशातील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. याआधी सरकारने हवाई कनेक्टिव्हिटीसाठी ‘उडान’ योजना आणली होती. या योजनेअंतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचा आणखी विस्तार करण्यात येत आहे. त्यासाठी 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून खाजगी क्षेत्राकडून 15 हजार कोटी उभारण्यात येतील.

या योजनेअंतर्गत नव्या विमानतळाची उभारणी करण्यात येईल. तसेच हेलिपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम उभारणारण्यात येतील. आतापर्यंत उडान योजनेअंतर्गत सहा वर्षात 1.15 कोटी नागरिकांनी विमान प्रवासाचा लाभ घेतला आहे. 2014 पर्यंत देशात 74 विमानतळे होती. आता देशातील विमानतळांची संख्या 147 वर पोहोचली आहे. यामुळे भारतीय नागरी हवाई उड्डाण क्षेत्र हे जगात तिसऱ्या स्थानावर असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटले होते.

leave a reply