पाकिस्तानात अराजक माजविणारा भारत लवकरच हल्ला चढविल

- पाकिस्तानी विश्लेषकांचा दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानात गृहयुद्धाच्या आगीत होरपळत असताना, याचा फायदा घेऊन भारत कुठल्याही क्षणी हल्ला चढवू शकतो, असे दावे पाकिस्तानातील काही कट्टरपंथिय विश्लेषक करीत आहेत. निदान भारताच्या हल्ल्याच्या धास्तीने इम्रान खान यांचे समर्थक हिंसाचार थांबवतील, असा तर्क त्यांच्या या बेताल आरोपामागे आहे. तर काहीजणांनी याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानातील गृहयुद्धामागे भारताचे पंतप्रधान व गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हात असल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानात अराजक माजविणारा भारत लवकरच हल्ला चढविल - पाकिस्तानी विश्लेषकांचा दावापाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लवकरच या देशात निवडणुका घ्याव्या लागतील. पण पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार त्याला तयार नाही. कारण या निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष जिंकेल, अशी चिंता लष्कर व सरकारला वाटत आहे. म्हणूनच निवडणूक टाळण्यासाठी इम्रान खान यांना गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली. यामुळे पाकिस्तानात सुरू झालेल्या गृहयुद्धाला या देशातील सत्तासंघर्ष जबाबदार आहे. अशा स्थितीत पाकिस्तानातील हिंसाचार थांबवून देशातील एकजूट कायम ठेवण्यासाठी भारतद्वेषाचा आधार घेतल्याचे दिसते.

पाकिस्तानात सध्या सुरू असलेला हिंसाचार व पेटलेल्या गृहयुद्धामागे भारताचेच कारस्थान आहे. याने पाकिस्तान दुबळा बनला की भारताचे लष्कर हल्ला चढविल, असा दावा हे भारतद्वेष्टे विश्लेषक करीत आहेत. यासाठी भारताने आधीपासूनच जय्यत तयारी करून ठेवलेली असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. या कटात भारतच नाही तर अमेरिका व इस्रायल हे देश देखील सहभागी झाले आहेत, असा दावा या कट्टरपंथिय विश्लेषकांकडून केला जातो.

हिंदी

 

leave a reply