नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे ५५२ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या ५,
महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरातच सर्वाधिक रुग्ण आढळले असून केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयानेही मुंबईतील वाढत्या रुग्णांच्या संख्येवर आणि लॉकडाऊनच्या वाढत्या उल्लंघनावर चिंता व्यक्त केली होती. लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्यात आला नाही, तर संक्रमण वाढण्याचा धोका असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले होते. तसेच या शहरांमध्ये एक केंद्रीय पथक पाठविण्याची घोषणा केली होती. हे पथक सोमवारी रात्री राज्यात दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबई, पुण्यातील शिथिल केलेले नियम पुन्हा मागे घेण्याची घोषणा केली आहे.
राज्याची आर्थिक केंद्र असलेल्या या दोन्ही शहरात जीवनावश्यक गोष्टींच्या दुकानांबरोबर निवडक उद्योग, व्यापारी आस्थापनांना परवानगी देण्यात आली होती. इ-कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक्स वस्
मुंबई आणि पुण्यात यापुढे लॉकडाऊन अधिक सक्तीने राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत कोरोनारुग्ण सापडल्यावर प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्रतिबंधीत भागांची संख्या ८१३ वर पोहोचली आहे. ९ एप्रिलला प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या ३८१ होती. धारावी, वरळी भागात दरोरोज नवे रुग्ण आढळत असून धारावीतील या साथीच्या रुग्णांची संख्या १८० झाली आहे. तसेच पुण्यात रुग्ण आढळत असलेल्या १० पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच दुकानेही बंद राहणार असून केवळ सकाळच्या वेळेत दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ६०३ वर गेली असून २४ तासात ४४ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला. तसेच रुग्णांची संख्या १९००० वर पोहोचली आहे.